अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany
• इंग्रजांच्या काळात थंड हवेचे ठिकाण म्हणून अंबाबरवा स्थळ प्रसिद्ध होते.
• स्थान :
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर पूर्व विभागात अंबाबरवा अभयारण्य आहे.
• स्थापना : ९ एप्रिल १९९७ साली अंबाबरवा अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली.
• क्षेत्रफळ : १२७. ७२ चौ. किलोमीटर.
• अभयारण्यातील हवामान :
उष्ण कटिबंधीय कोरडे पानझडी स्वरूपाचे हे अरण्य आहे.
• अभयारण्य पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :
• नागपूर हे जवळील आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे.
• नागपूर – अमरावती – अकोट – तुंकी मार्गे आंबा बरवा रस्ते मार्गे जाता येते.
• शेगाव जवळील रेल्वे स्टेशन ६० किलोमीटर अंतरावर आहे येथून संग्रामपूर मार्गे अंबाबरवा अभयारण्य पहायला जाता येते.
• वनस्पती जीवन : सागवान, मोह, कवठ, पिंपळ, वड, बेल, अंजन, टेमारु, धामण, कटक, आंबा, साल, कडूलिंब, घोस्ट ट्री, हळदू, बांबू, जांभळं , चिंच हे वृक्ष वेगवेगळी कंदमुळे देखील आढळतात.
• प्राणी जीवन : रानडुक्कर, हरिण, वाघ, भुंकणारे हरिण, चितळ, नीलगाय, सांभर, अस्वल, रोही, माकडे, लंगूर, ढोल, साप, अस्वल, चितळ, उडणारी खार, मकाक यासारखे प्राणी येथे पहायला मिळतात.
• पक्षी : मोर, पारवा, तितर, तांबट, सुतारपक्षी, खंड्या, कोकिळ, रानकोंबड्या, कृष्ण गरुड , पोपट, व अन्य स्थलांतरित पक्षी व पाणपक्षी येथे पहायला मिळतात.
• अभयारण्यात पाहण्यासारख स्थळे :
• जटाशंकर धबधबा :
अभयारण्यात मध्य परिक्षेत्रात असणारा हा धबधबा, शंकराच्या जटे सारखा जलप्रपात होतो . म्हणून त्यास जटाशंकर म्हटले जाते. पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
• पिंपळडोह किल्ला :
• अरण्यात पिंपळडोह असणारा किल्ला. बरीच पडझड झालेली आहे. काही अवशेष शिल्लक आहेत. विशेषत गोंड अथवा कोरकू आदिवासींनी बांधला असावा.
• तीन दगड टॉप :
महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर असणारा अरण्यातील सर्वात उंच भाग यास तीन दगड म्हंटले जाते. येथून अभयारण्याचे विहंगम दर्शन होते. येथे बुध धर्मीय बांधकाम आढळते.
• सोनबर्डी धरण : अभयारण्य परिसरात मोठे सोनबर्डी धरण पाणलोट क्षेत्र आहे. जे अरण्यातील प्राण्यांची पिण्याची गरज भागवते. तसेच जलसिंचनासाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे.
• हडिया महाल : अभयारण्य परिसरातील एक निरीक्षण क्षेत्र म्हणून हडिया महाल ओळखले जाते.
• असलदरी, अंबाबारी : अभयारण्य परिसरात प्राणी निरिक्षणासाठी व अरण्याची मुख्य वन क्षेत्र म्हणून तसेच प्राणी पक्षी आदिवास ठिकाणे असलदरी, अंबाबारी होत.
• धूळघाट : विरळ जंगल, गवत मुख्य प्रमाणात येथे वाढते. शाकाहारी प्राणी विशेषत गवा, नीलगाय, हरणे, सांबरे या परिसरात गवत खाण्यासाठी येतात.
• अभयारण्य पाहणी करण्यासाठी योग्य काळ :
• जुलै ते सप्टेंबर पावसाळी निसर्ग पाहता येतो. पण पावसामुळे गैरसोय होते.
• ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा अभयारण्य पहायला उत्तम काळ आहे. अनेक पक्षी निरीक्षण करता येतात. विणीच्या हंगामात येथे स्थलांतरित पक्षी येतात.
• मार्च ते मे फक्त पाणवठा परिसरात प्राणी निरीक्षण करता येते.
• अभयारण्य पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकांना राहण्यासाठी वन विभागाद्वारे निर्मित विश्रांती क्षेत्र आहेत. तसेच किले पिंपलाद गावाजवळ थोड्या अंतरावर गेस्ट हाऊस आहेत. या परिसरातून जंगल सफरीचा आनंद लुटता येतो.
• अभयारण्य पाहणी करताना घ्यावयाची काळजी :
• परिसरातील माहितीगार गाईड असणे उत्तम.
• प्लॅस्टिक बॉटल, प्लास्टिक पिशवीतील खाद्य पदार्थ नेऊन प्रदूषण करू नये. कापडी किंवा कागदी पिशवी वापरणे उत्तम आहे.
• प्राणी निरीक्षण करताना कोणताही आवाज करू नये. त्यांना स्पर्श करू नये.
• अभयारण्य पाहणी मार्गावरून आड बाजूला जास्त घुसू नये. टेहळणी मार्गावरून दुर्बिणीतून पाहणे उत्तम.
• प्राणी पाहताना वापरल्या जाणाऱ्या गाडीतून खाली उतरू नये.
• कॅन्टर, जिप्सी, यासारखी वाहने वापरावीत. ती खूप सोयीची आहेत.
• प्राणी निरीक्षण व फोटो कॅमेऱ्यात घेणे उत्तम. मोबाईल वापरू नये
अशी आहे आंबा बरवा अभयारण्याची माहिती.Ambabarva abhyaranyachi mahiti








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.